- शाहजहान मगदुम
रविवार दि.६ मे २०१२ रोजी टीव्हीवर आमिर खानचा ‘सत्यमेव जयते’ हा रिअलिटी शो पाहिल्यानंतर आज समाजाला उच्च कोटीच्या नैतिकतेची किती आवश्यकता आहे याची जाणीव झाली. 'कन्या' संदर्भातील प्रथम भाग सर्वांच्या हृदयाला स्पर्शून गेला हे नि:संशय. राजस्थानमधील ते 'भ्रूणहत्या कांड' पूर्वी सहारावर पाहिले होतेच, पण आज त्या दोन पत्रकारांना आमीरने थेट स्टुडिओत बोलावून त्यांच्या गेल्या ७ वर्षातील या संदर्भातील लढा समोर मांडला. त्यावेळी समजून चुकले की अगदी थेट राष्ट्रपती तसेच पंतप्रधान कितीही तावातावाने 'गर्भपात विरोधी' कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल बोलू देत, परिस्थितीत यत्किंचितही फरक पडलेला नाही.
|
|||
- अशफाक पिजारी, जळगाव
पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्याबरोबर निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसप्रणित यूपीए सरकारने अल्पसंख्याकांना साडेचार टक्के आरक्षण जाहीर केले. प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी जनतेचे खरे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी धर्म, भाषा,जात, अस्मिता, संस्कृतीचे प्रश्न उभे करून जनतेच्या भावना चेतवून मते मिळविण्याचे राजकारण करीत आहे. या तंत्रात काँग्रेस आणि भाजप हे पक्ष सर्वात पुढे आहेत. निवडणुका आल्या की, जनतेला भ्रामक आश्वासने देऊन, फसव्या घोषणा करून, मते संघटीत करण्याचे तंत्र पुढे आले आहे.
|
|||
- ए.एम.लांडगे
’’लोकांना सांगा की, अल्लाह अश्लिलतेची आज्ञा कदापि देत नसतो. कुरआन (७:२८).’’
लोकांसमोर, समाजासमोर, देशासमोर विवस्त्र होणे निषिद्ध आहे. भौतिक संस्कृतीने नग्नता स्वीकारली आहे. लज्जास्पद कृत्याला समाजाने मान्यता दिली आहे. स्त्री-पुरुष स्वातंत्र्याच्या नावाखाली हा अत्याचार सर्रास होत आहे. सज्जन व प्रतिष्ठित व्यक्तीने यास मूक दुजोरा दिला आहे.खेदाची गोष्ट अशी की हिंदू धर्मात देवी-देवतांना याच स्वरूपात प्रकट केले जाते. त्यानुसार काही पुजा- आराधनेच्या वाटा याच माध्यमातून जातात. जर धर्मात असे वैध आहे तर ही स्पष्ट निशाणी आहे की असा धर्म ईश्वराकडून आलेला धर्म नाही. अशा जीवनपद्धतीचा व जीवन धर्माचा अल्लाहने अवतरित केलेल्या व्यवस्थेशी काही सबंध नाही. निसर्गाने तर लज्जा व शरमेची भावना मनुष्याच्या मनात ठेवली.
|
|||
सोलापूर-
’’धार्मिक किंवा भाषिक अल्पसंखिक शिक्षम संस्थेमधून केवळ भौतिक विषयाचे शिक्षण द्यावे, अध्यात्मिक किंवा धार्मीक शिक्षण (पवित्र कुरआन, पवित्र प्रेषितांची शिकवण) देवू नये; अशाप्रकारचे शिक्षण दिल्यास, शिक्षणाचा हक्क खर्चासाठी या विधेयकाचा भंग ठरेल, नियमभंग करणाऱ्या संस्थांवर १ लाख दंड व संस्थाचालकास सहा महिन्याची शिक्षा होणार आहे,’’ अशी धक्कादायक माहिती मौलाना खालीद सैफुल्लाह रहमानी यांनी दिली.
पानगल प्रशालेच्या भव्य प्रांगणात, सायंकाळी ७ वाजता, विशाल अशा जनसमुहास संबोधीत करताना, मौ. खालीद बोलत होते.ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड, नवी दिल्ली अंतर्गत कुल जमाअती तंजीम सोलापूरतर्फे संविधानीक हक्क वाचवा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
|
|||
जिजाऊ ब्रिगेडच्या बिना चेलेकर यांचे प्रतिपादन
’सेव्ह गर्ल्स’ म्हणजे ’लेकी वाचवा’ असा नारा देत येथील मुंबई पत्रकार संघाच्या प्रेस क्लब हॉलमध्ये जमात-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्र तर्फे भ्रूणहत्त्येविरोधात एक पत्रकार परिषद नुकतीच संपन्न झाली. या परिषदेला जमात-ए-इस्लामी हिंदचे ’राष्ट्रीय व आंदरराष्ट्रीय’ विभागाचे सचिव अस्लम गाजी, जमातच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र दक्षिण विभागाच्या उपप्रमुख बुशरा नाहिद, जमातच्या सदस्या मुमताज नजीर शेख, अस्मा मेमण यांनी संबोधित केले. यावेळी जमातचे प्रवक्ता हाफिज फारूकी व प्रसिद्ध समाज सेविका उज्मा नाहिद, गजाला अमिन तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या बिना चेलेकरदेखील उपस्थित होत्या.
|
|||
शकील इंजिनीअर यांजकडून
बुरख्यात परिक्षा देताना अडथळे आणल्यावर जीआयओने केली निदर्शने
सध्या राज्यभरात दहावी-बारावीच्या परिक्षांचा मौसम आहे. येथे परिक्षागृहात मुस्लिम विद्यार्थिनिंना ’कॉपीविरोधी मोहिमे’च्या नावाखाली पुरूष शिक्षक हे विद्याथर्निा बुरखा काढण्यासाठी विवश करत आहेत आणि त्या विद्याथर्निची तपासणीदेखील पुरूष शिक्षकच घेत आहेत. यासंबंधीची बातमी शहरभरात पोहोचताच जमात-ए-इस्लामी हिंदच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी भगिनी व सदस्या तसेच गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायजेशन ऑफ इंडिया (जी.आय.ओ.)च्या पदाधिकारी विद्यार्थिनी व सदस्यांतर्फे येथील जिल्ला शिक्षणाधिकारी प्रकाश अंधारे यांना एक निवेदन सादर करण्यात आले.
|
|||
- प्राचार्य व्ही. के. भदाणे
शिवजयंती उत्सव - हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा उत्सव दरवर्षी आता १९ फेब्रुवारी रोजी रायगडावर भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जातो. मोठ्या शहरात उत्साहाने हा उत्सव साजरा होत असतो पण ग्रामीण भागात तसा नाही.
शिवजयंतीची सुरुवात - केव्हांपासून आणि कोणी केली? हे अनेकांना माहीत नाही. काही म्हणतात, लो. टिळकांनी सुरू केली वगैरे परंतु टिळकांपूर्वी म. ज्योतिबा फुलेंनी शिवाजी राजेंची समाधी प्रथम शोधली. (जी समाधी पडकी काट्याकुट्यात गडप होती.) त्यांनी शिवाजी महाराजांवर कुळवाडीभूषण हा पोवाडा रचला. त्यांच्यातल्या महाराजांवरील प्रेम, श्रद्धा, भक्ती पोटी महाराष्ट्राच्या राजाबद्दलची अस्मिता म्हणूनच ’शिवजयंती उत्सव’ १८८६ साली सुरू केला.
|
|||
- एम. एम. लांडगे
’’वस्तुस्थिती अशी आहे की मानव आपल्या रबशी (पालनकर्त्याशी) कृतघ्न आहे. (कुराण १००-६)’’.
मानव परलोकाचा इन्कार अथवा त्यापासून गाफील राहून नैतिक पतनात कोसळतो. वस्तुतः परलोकात त्याच्या उघड बाह्य कृत्यांचीच नव्हे किंबहुना त्याच्या हृदयात गुप्त असलेल्या रहस्यांची देखील तपासणी होईल. जगात सर्वसाधारण अशांती पसरलेली आहे. माणसाचे जीवन त्यामुळे त्रस्त झाले आहे. चोहीकडे छळ, रक्तपात, भ्रष्टाचार व अन्यायास उधाण आले आहे. दादागिरी करणारे देश दुर्बलावर हल्ले करत आहेत. माणूस आपली रात्र समाधानाने, शांतपणे व्यतीत करू शकत नाही. प्रत्येक वेळी ही धास्ती लागलेली आहे की कोणी त्याच्यावर तुटुन पडेल. या परिस्थितीची जाणीव सर्वांना आहे. दृष्टता, दुर्दशा सर्व जण अनुभव करीत आहेत. लुटली गेलेली माणसे यावर दुःख, शोक करीत आहेत आणि लुटारू यावर आनंदित आहे. त्याचबरोबर लुटारूदेखिल दुर्दशेत आहेत. मृत्युनंतर दुसरे जीवन आणि त्यात अल्लाहच्या पुढ्यात जाब द्यावा लागणार यापासून अनभिज्ञ होउन तो आपल्या पालनकर्त्याचा कृतघ्न बनला आहे.
|
|||
- एम. एम. लांडगे
’’हे पैगंबर (स.) आपल्या अतिमहान पालनकर्त्याच्या नावाचे पावित्र्यगान करा, ज्याने (मानवास, सृष्टीस) निर्माण केले व प्रमाणबद्धता प्रस्थापित केली. ज्याने भाग्य बनविले मग मार्ग दाखविला, ज्याने वनस्पती उगवल्या मगत्यांना काळा केरकचरा बनवुन टाकले. (कुराण ८७:१-५).’’
यात एकेश्वराच्या शिकवणीस उजाळा दिला. सर्वश्रेष्ठ अल्लाहचे सतत स्मरण केले जावे ज्याला तो सर्वस्वी पात्र आहे. जी नांवे अनेकेश्वरवादाचा एखादा पैलू प्रकट करतात, वा त्याच्या अर्थात चुकीच्या श्रद्धेचा भास होतो अशी नांवे कदापि उच्चारू नये. भक्ताकरीता जी नांवे आहेत त्यात सावधगिरी बाळगली पाहिजे की, सेवकाकरीता त्याचा उपयोग त्याप्रकारे होउ नये ज्याप्रकारे अल्लाहसाठी होतो. अल्लाहचे नांव अदबीने, आदर सन्मानाने घेतले पाहिजे. एखाद्या अशा पद्धतीने जेथे पावित्र्याचा अभाव आहे, जे त्याच्या गौरवाला प्रतिकूल आहेत
|
|||
मौलाना जलालूद्दीन उमरी यांचे क्रांतीकारी प्रतिपादन
जमात-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना जलालूद्दीन अन्सर उमरी (दिल्ली) यांनी ’आदर्श कुटूंब, आदर्श समाज’ या विषयावर बोलताना सांगितले की, ’’लेकरं लहान असताना त्यांच्या संगोपनाची जबाबदारी माय-बापांची आहे आणि माय-बाप म्हतारे झाल्यावर त्यांची सगळी सोय करण्याची जबाबदारी लेकरांची असते. इतकेच नव्हे तर बाप फार वृद्ध झाला नसेल तर आपल्या बापाचे लग्न करून देण्याची जबाबदारीदेखील त्याच्या मुलाची आहे.
|
|||
